Wednesday, December 6, 2017

मेरे पास माँ है ...! - शशी कपूर ,


मेरे पास माँ है ...!
कुणी कलाकार गेला कि मनाला वेदना होतात ... खरं  म्हणजे कलाकार कधीही मरत नसतात ते रसिकांच्या मनात अमर होत असतात..! परवा शशी कपूर गेल्यानंतर असंच काहीतरी वाटलं ... दिवसभर मनाला चुटपुट लागून राहिली ... काहीतरी हरविल्यासारखं वाटलं .... खूप विचार केल्यानंतर याचा उघड झाला ...!
                     मागे विनोद खन्ना गेल्यानंतर असाच काहीतरी लिहावंसं वाटलं होतं ... आणि लिहिलंही होतं  आजही तसंच झालं ..!  कारण अमिताभ बच्चन , शशी कपूर , विनोद खन्ना, शत्रुघन सिन्हा , विनोद मेहरा ...या कलाकारांनी आमचं बालपण सुखकर केलं ..! सिनेमा मधून जे संस्कार झाले ते मनावर कायमचे कोरले गेले . ( पूर्वी सिनेमा मधून सुद्धा उत्तम संस्कार होऊ शकत असत ..! )  आई , वडील , मोठा भाऊ , लहान भाऊ , गुरु , बुजुर्ग , समाजामध्ये कसं वागावं हे चित्रपटातील हिरो च्या वागण्यावरून आम्ही शिकलो. शशी कपूर हा सुद्धा अतिशय उमदा , देखणा आणि कोणत्याही  'कॅरॅक्टर' मध्ये शोभणारा कलावंत ...!
                अमिताभ चा जमाना असताना, सगळ्या भूमिका अमिताभ यांच्या साठी लिहिल्या जात असताना , त्या काळात आपला स्वतंत्र ठसा उमटविणे इ खुप मोठी गोष्ट होती ..! दिवार  मधला प्रसंग ...दोन भावांमधील द्वंद्व... अमिताभ ला सही मागणारा इन्स्पेक्टर भाऊ ... अमिताभचे चे जबरदस्त ' जाव पहले ऊस आदमी का साईन  लेकरं आव ... असे जबरदस्त डायलॉग ...नंतर मेरे पास ..गाडी है , बंगला  है ...असा म्हणत...  क्या है तुम्हारे पास ? असा सर्वांची बोलती बंद करणारा सवाल ...भावनांचा कल्लोळ उभा करणारं  दृश्य ......अशा वेळी शशी कपूर यांनी चारच  शब्दांत हि लढत जिंकली ...मेरे पस माँ है ...! मुद्राभिनयाचा जबरदस्त अविष्कार शशी कपूर यांनी पेश केला आणि या एका डायलॉग ने अख्खी पिढी संस्कारित केली ..!
चार दशकानंतर सुद्धा.."  मेरे पास  माँ है .."! ह्या एका वाक्याचा प्रभाव आजही कायम आहे. याचं  क्रेडिट जसं सलीम - जावेद यांच्या लेखणीला तसाच शशी कपूर यांच्या उत्कट अभिनयाला सुद्धा ..! अमिताभ समोर काम करायला त्या काली कलाकार कचरत असताना शशी कपूर मात्र अमिताभ बरोबर अनेक यशस्वी चित्रपटात ठामपणे उभे राहिले . दिवार , कभी कभी , शान, इमान धरम , काला  पत्थर , त्रिशूल, सुहाग, नमक हलाल, सिलसिला असे अनेक चित्रपट सांगता येतील .
                अवखळ नाचणारा नायक ते धीर गंभीर पोलीस अधिकारी अशा शेकडो व्यक्तिरेखा शशी कपूर यांनी सहज साकारल्या. त्या काळातल्या नंदा , हेमामालिनी, रेखा, शर्मिला टॅगोर , मौशमी चॅटर्जी , झीनत , परवीन बाबी अशा अनेक दिग्गज नायिकांबरोबर पडद्यावर त्यांची जोडी जमली. आम्ही तारुण्यातआल्यानंतर शशी कपूर यांचा अभिनय समजायला लागला. निर्माता म्हणून काही त्यांनी चाकोरीबाहेरचे चित्रपट दिले . उत्सव , विजेता , ३६ चौरंगी लेन या चित्रपटांनी शशी कपूर यांची वेगळी ओळख रसिकांना दिली. पुढे तर ...अमेरिका आणि ब्रिटिश चित्रपटात काम करणारा पहिला भारतीय कलाकार म्हणून हि शशी कपूर  यांची ओळख होती .
                   मी व्यावसायिक नाट्यक्षेत्रात आल्यानंतर शशी कपूर यांची वेगळी ओळख समजली. व्यवसायिक चित्रपटातला हा यशस्वी कलाकार, नाट्यक्षेत्र पुढे येण्यासाठी धडपड करत होता. संपूर्ण हयात नाटकाचे दौरे करत घालविणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचं 'हक्काचं  नाट्यगृह हवं " हे स्वप्न ह्या बेट्याने पूर्ण करत नाटकासाठी 'पृथ्वी थियेटर'  उभं केलं. आपल्या मालकीच्या नाट्यगृहात सुद्धा तिकीट काढून येणार हा अवलिया नाट्यसंस्कृतीच एक जबरदस्त वारसा देऊन गेलाय ...!
                                  २०१५ मध्ये दादासाहेब फाळके, २०११ मध्ये पदमभूषण , आणि २०१० मध्ये फिल्मफेअर लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळविणारा हा कलाकार ...आजच्या नवीन पिढीसाठी एक नायक , कलाकार निर्माता आणि त्याहूनही जास्त एक माणूस म्हणून आदर्श ठरावा ...!

मेरे पास माँ है ...हे म्हणताच
         तू डोळ्यासमोर येत राहशील ,
येणाऱ्या अनेक पिढयांना
एक नवा आदर्श देत राहशील ...!

तुझा चाहता - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Monday, July 17, 2017

सावध व्हा ..!


नमस्कार ...!
सध्या ...नदी , धरण, जलाशय, तलाव, धबधबे, यामध्ये पोहताना होणारे तरुणांचे मृत्यू ...अशा रोजच्या बातम्यांनी हैराण आणि बेचैन व्हायला होतंय ...आनंद घेताना स्वत:च्या सुरक्षिततेविषयी असलेली दुर्लाक्षितता अनेकांच्या जीवावर बेततेय ...! रोजच्या या घटनांनी मन हळहळत...ज्यांच्या घरातला तरुण, करता पुरुष जातो तेव्हा त्यांच्या कुटुंबावर किंवा त्यांच्या बरोबर गेलेल्या त्यांच्या मित्रांवर किती गंभीर मानसिक परिणाम होत असतील याची आपण कल्पनाच करू शकत नाही.  आपण याचा कधी गंभीरपणे विचार केला नाही ..करत नाही ..याची गंभीरतेची तरुणांना जाणीव करून द्यावी म्हणून या पोस्ट ची उठाठेव....!.
    नदी , धरण, जलाशय, तलाव, धबधबे, अशा ठिकाणी जाण्याचंसध्या फड आहे आणि ते वाढतेय . हे सव निसर्गप्रेम असेल असे आपण समजायचं का ? निसर्गप्रेम असेल तर निसर्ग  हा वर्षभरातल्या वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी रूपे धरण करतो ...अर्थात पावसाळ्यात तो खचितच सर्वात सुंदर असतो ...परंतु सध्या वीकेन्ड संस्कुती वाढतेय ...आपल्या मित्रांबरोबर ..कुटुंबाबरोबर अशा ठिकाणी जाऊन मजा करणे ...वाईट नाही ...परंतु तिथे जाऊन दारू पिणे, धोक्याच्या ठिकाणी जाऊन साहसी खेळ करणे , पाण्याचा अंदाज न घेता पोहणे यामुळे अशा दुर्घटना होताना दिसतात ..आणि अशा दुर्घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना टाळण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो ....
१. ज्या धबधबा , जलाशय, नदी,धरण, तलाव जिथे आपण जात आहोत त्याची भौगोलिक माहिती हवी ( उदा. नदीच्या पत्राची खोली, प्रवाहाचा साधारण वेग, वाढण्याची शक्यता, पत्रात असणारे खडक, धोके )
२. त्या ठिकाणच्या अपघातप्रवण जागा माहिती करून घ्याव्यात.
३. पोलीस आणि इतर तत्सम सुरक्षा यंत्रणा यांचे निर्देश माहित करून त्यांचे पालन करावे .
४. सुरक्षेसाठी अत्यावश्यक गोष्टी ( उदा. लांब दोरी , तरंगणारे गोल , प्रथमोपचार   साहित्य ) अशा गोष्टी बरोबर असाव्यात.
५. आपल्या मित्र परिवारात एक दोन लीडर नेमावेत आणि त्यांना उगाच साहस करणाऱ्या मित्रांना रोखण्याची जबबदारी द्यावी .
६. पैज लावणे , काहीतरी अचाट करायला प्रोत्साहन देणे टाळावे . हि दुर्घटनेची नांदी असते.
७. दारू, किंवा कोणतेही मादक पदार्थ सेवन  करू नये. घेऊनच जाउ नये .
८. सावध राहावे , चाणाक्ष राहावे , सुरक्षित राहावे आणि सहलीचा आनंद लुटावा ..!

आपल्याला उगाचच उपदेश करावा हा हेतू नाही ...!
मानवी जीव वाचवू या ...
यासारखा दुसरा मानवतेचा सेतू नाही ...!

आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Monday, July 3, 2017

धन्यवाद ..!

नमस्कार ..!
माझा वाढदिवस आपण सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन खूप भव्य केलात ...! माझ्या सर्व, चाहते, रसिक प्रेक्षक, मित्रमंडळी, नातेवाईक , हितचिंतक, समाजातील मान्यवर व्यक्ती यांनी दाखविलेल्या या प्रेमामुळे खरच भारावून गेलो आहे ...! आपण दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे एक नवीन स्फूर्ती नेहमीच मिळते ...!असेच प्रेम आणि अशीर्वंद असू द्या ...! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
मी आपुल्या प्रेम आणि आशिर्वादाला,
        विनम्रपणे स्वीकारतो ...!
रसिका तुझ्याचसाठी , आम्ही
         स्वतःला जोकर म्हणवितो ..!
आपल्या हशा आणि टाळ्यांची झिंग
          आम्ही वारंवार अनुभवतो .....!
आमुच्या प्रत्येक जन्मी, हे परमेश्वरा ...
         मी कलाकाराचा जन्म मागतो ...!
-आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, June 13, 2017

नवीन काही तरी ...नवीन गझल - हल्ली ...!

आजकाल कुणीही कवींचा 'ग्रेस' होतो हल्ली
पुरे 'एक' च कविता, तोच 'बेस' होतो हल्ली ...!

ज्यांना कधी कुठे ना, दिसतो समाज हल्ली ..
त्यांचा कुठे कुठे हि समावेश आज हल्ली ...!

वाळू कधी न त्यांच्या पायांमध्ये ना सळली ..
उंटावरून त्यांचे हाकणे बरेच हल्ली ...!

वरवरून आता त्यांचे होतील हि इशारे
त्यांचीच सारी 'पत्रे', त्यांचीच सर्व गल्ली ...!

आमुच्या मुशाफिरीने त्यांची बरीच जळते ..
आम्ही जाणतो " अपना हाथ जगन्नाथ ' हल्ली ...!

- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Tuesday, June 6, 2017

दि. ५ जून २०१७ - पर्यावरण दिन ..!

नमस्कार ..!
दि. ५ जून २०१७ -
आज पर्यावरण दिन ..! छायाचित्रणाचा छद सुरु करताना पहिला फोटो मला निसर्गाचाच काढावासा वाटला ...! मोबईल हातात होता ...सहज लक्ष वर गेलं ..झाडावर फुललेली फुलं जणू काही 'आमचं छायाचित्र काढा " म्हणून आमंत्रण देत होती ..!
आज पर्यावरणावर बरीच चर्चा होईल, काही चांगले कार्यक्रम होतील, उपक्रम राबविले जातील...परंतु हे फक्त एक दिवस न करता 'पर्यावरण संवर्धन " हा आपल्या जीवन शैलीचा एक भाग बनेल तेव्हा खरच असे वाटेल कि ' पर्यावरण' हा विषय आपल्याला समजायला लागलाय ...!
फार कठीण नाही हे समजण.! आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. निसर्गाला हिंदीत 'प्रकृती ' म्हणतात. आपण कुणाला बरं नसेल तर त्याची 'प्रकृती'ठीक नाही असे म्हणतो ,,...निसर्गाला इंग्लिश मध्ये 'Nature' म्हणतात ...एखादा माणूस ठीक वागत नसेल तर आपण त्याच' NATURE' ठीक नाही असे म्हणतो.
तात्पर्य ; निसर्ग म्हणजेच आपण आणि आपण म्हणजच निसर्ग ..! कुठेतरी वाचल होतं " GOD always comes through Nature to meet us'. ! फुले, फळे , झाडे, वेली, वृक्ष , डोंगर, दऱ्या, नदी, नाले, झरे... करोडो सूक्ष्म ते महाविशाल चमत्कार हा निसर्ग रोज करत असतो. " गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी आपल्याला काय संदेश देतात ? हा संदेश पुन:निर्मित करण्याची गरज आहे ...! कुठेतरी छानशी कविता वाचली होती ...
मिट्टी भी हसती ही कभी ,
ये सोचकर हसता था मै पहले ...
फुलो का परिवार देखकर ..
अब विश्वास हुआ है मुझको ...!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे
sanjeevanmhatre.blogspot.in
#chaprak
# yal tar hasal
#thoda manatal, thoda janatala

Friday, May 12, 2017

माणसे आणि झाडे


                  परमेश्वराने माणसे आणि झाडे वेली निर्माण केली ..! दोन्हीही सजीव ..! प्रत्यक्षात परमेश्वराने प्राणी , पक्षी आणि वृक्ष, वेली निर्माण केली असावेत किंवा निर्माण झाले असावेत ( परमेश्वर आहे किंवा नाही या विषयात मी जात नाही ). माणूस हा पूर्वी प्राणी या प्रकारातच मोडत होता. वेगवेगळ्या आकाराची झाडं निर्माण केली परमेश्वराने, वेगवेगळ्या आकारांची, वेगवेगळ्या उंचीची, पानांच्या वेगवेगळ्या प्रकाराची, खोडाच्या वेगवेगळ्या प्रकाराची, वेगवेगळ्या मातीत , पाण्यात , हवामानात रुजणारी , करोडो प्रकारची फुलं देणारी, फळ देणारी , जमिनीवर वाढणारी , जमिनीखाली वाढणारी , वेली म्हणजे आधार घेऊन वाढणारी , दुसऱ्या झाडाला शोषून वाढणारी परजीवी ...लाखो प्रकारची झाडे आपल्याला माहित आहेत ....!
           याचं प्रकारची माणसे सुद्धा आहेत ...तशिच ...करोडो प्रकारची माणसे ...वेगवेगळ्या रंगांची , उंचीची , वेगवेगळ्या गुणांची , अवगुणांची , काळी , गोरी, सावळी, लाल, निमगोरी , हजारो वर्णांची ...! एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही ...जेवढे झाडांचे प्रकार असतील तेवढ्या पेक्षा जास्त माणसांचे प्रकार असतील ...त्त्यात झाडांना धर्म नसतो ..जात नसते ...इथे माणसांनी धर्म , जाती, पोटजाती एवढ्या निर्माण केल्यात कि त्यांची गणती करवत नाही ...! प्रत्येक धर्माने , जातीने, पोटजातीने आपापला एक देव निर्माण केला आणि त्यांना नावही देऊन टाकली आणि मग आशा या रंगीबिरंगी दुनियेत आपला जन्म झाला. या वैविध्यपूर्ण दुनियेत माणसाने आनंदी , सुखी , मस्त जीवन जगणे साहजिकच अपेक्षित होते ...पण सगळा घोटाळा झाला .....
            झाडांमध्ये आणि माणसांमध्ये मुलभूत फरक आहे. झाडे जन्मापासून मृत्युपर्यंत एका जागी राहतात , कुठेही जात नाहीत , येत नाहीत , बोलत नाहीत, चालत नाहीत ....! आपल्या जवळ आलेल्या माणसाला , प्राण्याला सावली देणं , फळ देणं , फुलं देणं हे काम इमाने इतबारे करतात झाडं ...! कोणतीही स्तुतीची अपेक्षा नाही , सन्मानाची इच्छा नाही , पैसा साठवून ठेवायचा नाही , घर बांधायची नाही , इस्टेट कमवायची नाही , पोरांना मोठं करायचं नाही ....मस्त सुखी असावीत हि झाडे ....!!!
             माणसांचा इथेच मोठा प्रोब्लेम झाला....माणसे दुसऱ्यांच्या आयुष्यात दखल द्यायला लागली ...नाही स्वतः जगण्यासाठी त्यांना ती द्यावी लागली ...त्यामुळे माणसा-माणसांमध्ये तुलना सुरु झाली ...तुलनेमुळे स्पर्धा वाढली ....स्पर्धेमुळे धावपळ , दगदग , पळापळ सुरु झाली ..पूर्वीच्या काळात राज्य बळकावण्यासाठी युद्धे सुरु झाली ....माणसांच्या कत्तली झाल्या ...जीवघेण्या स्पर्धेसाठी ..अत्याधुनिक हत्यारे निर्माण झाली ...वेळ वाचविण्यासाठी वेगवान वाहने तयार झाली ....! आणि त्यानंतर माणसे पैसा कमविण्याच्या आणि साठविण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरली ...! विज्ञान युगात  भौतिक  सुखाच्या मागे धावताना त्यांना कसलीच परवा राहिली नाही ..! दुसऱ्याला कसं खाली खेचता येईल याचं विचाराने माणसे जगायला लागली ...स्वत: आनंद घेण्याचं सोडुन दुसऱ्याला कसं दु;ख देता येईल यातच मग्न झाली ...गुलझार यांनी खूप सुंदर लिहिलं आहे ....
\                   जिंदगी जाया कर दी.....
                         दुसरो के जिंदगी में झाकते झांकते....
                                  खुद के जिंदगी को तराशा होता
                                          तो फरिश्ते बन जाते ...!!!
अजूनही वेळ नाही गेलेली ...'सावर रे ' असाच म्हणावं लागेल ...थोडं थांबा ...विचार करा ...आयुष्य खूप छोटं आहे ...प्रत्येक क्षण स्वतः:चा आणि इतरांचा सुखाचा करा ....सर्वानाच हे माहिती आहे ...नवीन काही नाही ...तरीपण सांगण्याचा फुटकळ प्रयत्न केल्याशिवाय राहवलं नाही ...कारण आयुष्य तुमचं...विचार तुमचे ...आचरण तुमचं ...आणि हो ...त्यातून येणारे परिणाम पण तुमचेच ....कुठल्यातरी कवीने म्हटलं आहे ...
                                 हर एक लम्हें से ..
                                      खुशिया निचोड लो यारो ...
                                                घडी जो बीत गयी.....
                                                           लौटकर नाही आती .....!!!
                                                                                                - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Saturday, April 29, 2017

मुकद्दर का सिकंदर ..!


२७ एप्रिल हा दिवस नकोसा वाटला ...कारण विनोद खन्ना ने EXIT घेतली होती. माझ्या लहानपणी 'Black & White' दूरदर्शन वर 'इन्कार' पहिला ..आणि तेव्हा पासून माझ्या मनावर विनोद खन्नाच अधिराज्य सुरु झालं. त्या चित्रपटातील पळवून नेलेल्या लहान मुलाला शोधून आणणारा इन्स्पेक्टर 'विनोद खन्ना' मला देवदूत वाटला. "सॉलिड HANDSOME ' कसं दिसावं तर ते 'विनोद खन्ना' सारखं..! रोमांटिक राजेश खन्ना , अंग्री यंग मन अमिथाभ बच्चन , हि मन धर्मेंद्र या समकालीन हिरोंमध्ये 'सॉलिड मर्दानी हिरो ' म्हणून विनोद खन्ना चा एक जमाना होता. 'मर्दानी मार्दव ' काय असतं ते फक्त विनोद खन्ना ला तारुण्यात पाहिल्यावर कळत..! कुठल्याही तरुण मुलाने  स्वप्नात स्वताला 'असं दिसावं '  असा विनोद खन्ना त्यावेळी दिसायचा ....!
                 पण काळ आपली खेळी खेळत असतो ...कोणताही कलाकार त्याच्या उतारवयात बघताना मनाला खूप त्रास होतो , वेदना होतात, कारण त्यांची जबरदस्त 'छबी' आपल्या मानावर कोरलेली असते. प्रचंड धक्का जाणवतो अशा वेळी...आणि तो कलाकार करोडोंच्या मनावर अधिराज्य गाजविणारा असेल तर त्याची तीव्रता अधिकच जाणवते ..! 'मन का मित ' मधून 'खलनायक' म्हणून आलेला विनोद खन्ना बॉलीवूड वर अधिराज्य गाजविणारा 'नायक' ठरला. अमिताभ बरोबर तर त्याची अदाकारी सॉलिड रंगायची ..हेराफेरी , खून पसीना , मुकद्दर का सिकंदर ..परवरीश आणि अमर अकबर अन्थनि यामध्ये या दोघांनी धमाल केली . फिरोज खान बरोबर 'कुर्बानी' आणि ;दयावान' सारखे हिट देताना दोघांची मैत्री पण विशेष गाजली ...एवढच नव्हे तर दोघांच्या म्र्त्युची तारीख आणि कारण सुद्धा योगायोगाने एकच होतं...!
                  हे सर्व लिहायचं कारण ..विनोद ..तू एक कलाकार होतास ...आपल्या अभिनय कलेचा बेताज बादशाह ..! वार्धक्यामुळे झुकलेले कलाकार पाहताना मन हेलावून जातं पण कन्सर शी झुंज देताना तुझा फोटो पहिला आणि डोळ्यात पाणी तरळलं..कलाकार कला सादर करताना अनभिषिक्त समराट वाटतात ....पण वार्धक्य आणि जर्जर रोगांशी  झुंजताना आम्हाला त्यांना पाहवत नाही ..आपण कलाकार सुद्धा माणूस आहोत हेच खरं...!
              लिहिल्याशिवाय राहवलं नाही तुझ्याबद्दल ....! तुझं आयुष्य तू खऱ्या अर्थाने जगलास ...ऐन कारकीर्दीच्या शिखरावर असताना 'ओशो ' कडे जाण्याचा तुझा निर्णय ...राजकारणात पदार्पण करून तीन वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम , बॉलीवूड मध्ये पुनरागमन करून आपल् अभिनय कौशल्य  साऱ्या जगाला सादर करणं....हे सर्व निर्णय खूप कठीण होते ...परंतु तुझ्या निर्णयावर तू जगलास ...आयुष्यात अनेक वादळ पचवून खरा 'हिरो ' ठरलास ..! आणि तरीही कोणत्याही 'वादग्रस्त' गोष्टीत न अडकता सर्वांचा लाडका 'विनोद खन्ना' झालास ..!
               आम्हाला माहीत होतं आम्हाला आवडणारा तरुण विनोद खन्ना दिसणार नव्हता ...परंतु अभिनयावर प्रेम करणारा कसदार कालावंत तुझ्या रूपाने जिवंत होता हे आमचा भाग्यच होतं...! आज तू नाहीस ...परंतु पडद्यावर आमच्यासाठी एक आनंदाची मेजवानी तू ठेवून निघून गेलायस...आणि हो , तुझ्या रूपाने कलाकारांना शिकण्यासाठी आणि आयुष्य परिपूर्ण कसं जगावं हे दाखवून ...तू EXIT घेतलीस ....तुझ्याच चित्रपटातून आम्ही शिकलो ....जिंदगी तो बेवफा है...   एक दिन ठुकरायेगी
                 मौत मेहबूबा ही अपने  साथ लेकर जायेगी ...
                 मर के जिने कि अदा को ,दुनिया को दिखालायेगा
                 वो 'मुकद्दर का सिकंदर' जानेमन कहलायेगा ...!

                                                  सुप्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!
                                                              - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.
                 

Monday, April 3, 2017

"सेल्फ असेसमेंट"

नमस्कार ...!
"सेल्फ असेसमेंट" साठी जरा एक आठवडा जरा फेसबुक आणि Whatsup पासून दूर राहिलो. अनेक घडामोडी  माझ्या चाहत्यांना, रसिकांना आणि मित्रमंडळी ना सांगण्यासारख्या घडत होत्या ...'याल तर हसाल " चे कार्यक्रम , गुडीपाडवा वैगेरे अनेक गोष्टी ...! ३१ मार्च ला आपण सर्वजण ' आर्थिक असेसमेंट" करतो आणि त्यावर कर भरतो ...आणि हे सर्वाना कायद्याने करावेच लागते ...पण मनात एक विचार आला..कि कित्येक वर्ष आपण आपल्या  भावनांची, शरीराची , मनाची आत्म्याची आणि हो ..अर्थात आपल्या जीवनाची असेसमेंट केली आहे का ? याचं सर्वांचं उत्तर नाही च मिळेल ...माझ्याही मनात हा विचार आल्यानंतर मी शहारलो ...कारण  ...असा विचारच केला नाही ..किंवा असे करण्यासाठी वेळ च मिळाला नाही ..( कुणालाच वेळ नसतो आजकाल, आणि कशासाठीही वेळ  नसतो ...वेळ कुठे जातो हे सुद्धा न उमगणार कोडचं आहे ...) असो ..जीवन कोणत्या मार्गाने धावतंय ...स्पीड काय ? दिशा काय ? आणि हो धावण्याचं कारण काय ? काही माहिती नाही ...पळत सुटलोय ...तो पळतोय म्हणून मी हि ..त्याने स्पीड वाढवला ...मग मी हि वाढवणार ....जबरदस्त वेग ....2G , 3G,4G....रस्ते , हायवे , एक्स्प्रेस हायवे ..मोनो , मेट्रो ,बुलेट ट्रेन्स , .1000CC, 2000 CC, 3000CC ....अजून गाड्यांचे इंजिन मोठे होताहेत ...आणि हो या सर्व वेगात ..सर्वात वेगात धावतोय वेळ ! ...तो आपल्या पुढे पळतोय ...त्याला काबूत ठेवण्यासाठी ही स्पर्धा सुरु झालीय ...आणि या जीवघेण्या स्पर्धेत ...जगायचं विसरलोय आपण ..! निसर्गाची देणगी विसरलोय ...सुंदर आकाश , मस्त चांदण्या , शीतल चंद्र ..विशाल सागर , झाडे वेली ,वनराई .. पक्षांची किलबिल , गाई गुरे ,  ...हिरावून गेलंय सर्व ..! कितीतरी सुखं अजूनही आहेत या दुनियेत जी पैसे न मोजता सुद्धा घेता येतात , अनुभवता येतात ...! ( हजारो माणसे असतील कि दिवसभरात एकदाही आकाशात पाहत नसतील  ...त्याचं सौंदर्य नाहाळत नसतील ...आपणही कधी चांदण्याकडे पाहिलंय आठवा जरा ...! ) विषय एवढाच ...जीवनाच्या धकाधकीत ..जरा थांबा ...असेसमेंट करत राहा... वेळोवेळी ...आणि काहीतरी नवीन करत राहा ...आनंदी रहा आणि खऱ्या अर्थाने  समृद्ध व्हा  ..!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, February 9, 2017

अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोली भाषेतील कथाकथन मध्ये- संजीवन म्हात्रे ( आगरी भाषा )

नमस्कार ..!
अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोली भाषेतील कथाकथन मध्ये ..प्रथमच आगरी भाषेचा समवेश होता ..आणि आगरी भाषेतून कथा सांगण्यासाठी आयोजकांनी माझी निवड केली होती ..महाराष्ट्रातून आलेल्या मान्यवर कथाकारांच्या पंक्तीत बसने हे सौभाग्यच ...आणि माझा श्वास असलेली आगरी भाषा संपूर्ण महाराष्ट्राला ऐकवणं हे तर परमभाग्यचं...! बाबा पारिट (कोल्हापुरी), प्रसाद कांबळी ( मालवणी) विलास सिंदागीकर ( मांगी), राम निकम ( मराठवाडी ), डॉ. सुमिता कोन्द्बात्तुनावर ( झाडी बोली ) सुनील गायकवाड ( अहिराणी ) आणि संजीवन म्हात्रे ( आगरी ) ...! साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नाव असणं हे देखील खूप प्रतिष्ठेच मानलं जातं...माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला हा सन्मान दिला ..त्याबद्दल आयोजकांचे आभार ..! आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांचे विशेष आभार .. ! 'पैशाचा पाऊस' या माझ्या कथेने उपस्थित रसिकांची वाहव्वा तर मिळवलीच ,,..परंतु आगरी भाषेची गोडी , लहजा, सुद्धा मान्यवरांना अनुभवायला मिळाला ...! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Monday, February 6, 2017

९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन - 'आगरी कलादर्शन' कार्यक्रमात' याल तर हसाल '

९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ...महाराष्ट्रातील दिग्गज कवी, लेखक, विचारवंत, समीक्षक, गझलकार , साहित्यिक , साहित्यप्रेमी अशा सर्व सारस्वतांचा हा मेळावा ...या सर्व दिग्गजांसमोर 'आगरी कलादर्शन' कार्यक्रमात' याल तर हसाल ' चा काही भाग सादर करण्याची संधी मिळाली. आगरी समाजातील अनेक दिग्गज कलाकार यामध्ये एकवटले होते ..या सर्वांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्राला आगरी भाषा, संस्कृती , लोकगीते , नृत्य , आणि परंपरा याचे जबरदस्त प्रात्यक्षिक घडविले. लोकगीतांचे आणि कोलीगीतांचे बादशाह नंदेश उमप, जगदीश पाटील , संतोष चौधरी ( दादुस ), किसान फुलोरे , शिवशाहीर वैभव घरत ..आगरी झेंडा दिल्लीत नेणारी रुद्राक्ष डान्स अकॅडेमी आणि इतर अनेक कलावंत याबरोबर "याल तर हसाल " च्या सर्व कलाकार आणि मलाही संधी मिळाली याबद्दल आम्ही सर्व कलाकार स्वतःला खूप भाग्यवान समजतो. या कार्यक्रमासाठी श्री अरुण म्हात्रे आणि मयुरेश कोटकर आणि त्यांचे सहकारी ,या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. शिवाय हा कार्यक्रम संमेलनाच्या मुख्य रंगमंचावर ठेवण्यात आलं होता यासाठी स्वागताध्यक्ष आणि आगरी युथ फोरम चे अध्यक्ष श्री . गुलाब वझे आणि आयोजनातील सर्व सहकारी यांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Wednesday, January 18, 2017

१. झाडे लावा , झाडे जगवा ...!

 १. झाडे लावा , झाडे जगवा ...!

झाडे लावा झाडे जगवा, खूप दिवस वाचत आहे
एवढी वर्ष  का नाही सुचलं, हाच प्रश्न जाचत आहे ...!

एवढी वर्ष 'वृक्षारोपण ' पुढाऱ्यांच्या हस्ते होत होते
सामाजिक वनीकरण फक्य कागदावरती रुजत होते
दुष्काळाने आता जेव्हा पुरती कसर काढली
तेव्हा आम्हाला सगळ्याना झाडे वेली दिसली
हिरवा रंग हळू हळू मागे मागे सरत आहे ....
एवढी वर्ष  का नाही सुचलं, हाच प्रश्न जाचत आहे ...!

वस्त्या , अत्याधुनिक शहरे , नित्यनेमाने वसत गेली
निसर्गाचे देखावे हळू हळू पुसत गेली
प्रवासात कुठेही जा , शहरे आता संपत नाहीत
मानवाने निसर्गाला लुटले ,कुठेही आता लपत नाही
किडा , मुंगी, पशु, पक्षी कुणालाही आम्ही सोडलं नाही
एक तरी जागा दाखवा जिथलं झाड आम्ही तोडलं नाही
नदी, नाले, धरण -बिरण सर्व काही आटत आहे ...
एवढी वर्ष  का नाही सुचलं, हाच प्रश्न जाचत आहे ...!

नदी , नाले , झरे जाऊन गटारांचं 'SANITESHAN' झालं
फोरेस्ट , बिरेस्ट, एन ए करून सात बाराच VERIFICATION झालं
करोडोंची सॉलिड टाउनशीप याचं मस्त PRESENTATION झालं
नेते, बिल्डर, कारखानदार , व्यापारी सगळ्याचं COLABORATION झालं
निसर्गाला जगवायला पाहिजे यांना अजून कसे सुचत नाही
पांघरलेल्या गेंड्याच्या कातडीला पाझर कसा फुटत नाही
दिवसेन दिवस सारखा सारखा प्राणवायू आटत आहे
एवढी वर्ष  का नाही सुचलं, हाच प्रश्न जाचत आहे ...!
                                                                -  हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.


Wednesday, January 11, 2017

X-FACTOR Session in Government Polytechnic, Pen , Raigad - on 6th Jan, 2017

One more X-FACTOR session in Government Polytechnic college Ramvadi, Pen organised through MITCON. The Topic is Entrepreneur Development to boost the entrepreneurship mindset into the students. Nice Response from the Students and the college staff as well. Thanks to Mr. Shashikant Danorikar (MITCON ) and the Principal Mr.Vijay Kondekar sir and all students.
- Hasyprabodhankar sanjeevan Mhatre.

Monday, January 9, 2017

दि.7 जाने. 2017 आगरी महोत्सव बाळकुम

नमस्कार ..!
दि.7 जाने. 2017 आगरी महोत्सव बाळकुम ..माझी, लोकगीतांचा आवाज संतोष चौधरी (दादुस) आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठव पटू बळी म्हात्रे यांची LIVE मुलाखतीचा कार्यक्रम आयोजक श्री. मयुरेश कोटकर आणि ऑल इन वन संस्था यांनी आयोजित केला होता. शिक्षण हि 'थीम ' असलेल्या या महोत्सवामध्ये प्रत्येक गोष्टीतून हे प्रकर्षाने जाणवत होते. विवेक पोरजी यांनी मुलाखत घेताना तिघांच्याही जीवनातील संघर्षांचा आढावा घेतला. आम्हाला तिघांनाही धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रसिकांनी या मुलाखतींच्या कार्यक्रमाला सुद्धा जबरदस्त हजेरी लावली आणि प्रतिसाद दिला. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Saturday, January 7, 2017

दि. ५ जाने. १७ पाले ता.उरण मधील 'याल तर हसाल' चा 672 वा कार्यक्रम ..!

नमस्कार ...!
दि. ५ जाने. १७ पाले ता.उरण मधील 'याल तर हसाल' चा 672 वा कार्यक्रम ..! रसिकांची अलोट गर्दी ..हा विभाग माझा असल्यामुळे ..माझं बालपण आणि प्राथमिक शिक्षण या विभागात झालं..खूप क्रिकेट हि खेळलो या विभागात ..कलाकार म्हणून सुद्धा या विभागातल्या रसिकांनी अलोट प्रेम दिलं ..माझ्यावर आणि माझ्या कलाकारांवर असलेलं रसिकांचं उदंड प्रेम पाहून भारावून गेलो ..सॉलिड कार्यक्रम झाला ..रात्रीचे १:३० वाजेपर्यंत थंडीत ..आणि खमंग विनोदाची उब घेत रसिकांनी हा कार्यक्रम डोक्यावर घेतला. आयोजकांचे आणि सर्व मित्रमंडळींचे मन:पूर्वक धन्यवाद ..!!
आपला सर्वांचा - हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Tuesday, January 3, 2017

'Chief Guest' at the Annual Function of MITCON 'Connect 2016'


Namaskar ..!
Being honored as 'Chief Guest' at the Annual Function of MITCON 'Connect 2016'. A packed auditorium, full of energy, near 400 smiling faces of this young generation from Uran. Mr. prasad mandelkar and his entire team worked hard to make this wonderful event successful. The theme of this event if "Think out of the BOX " which gives the vision of this new year and motivate young students to think differently. I feel very happy to be the part of this fantastic event. Thanks MITCON team and the students.
- Hasyprabodhankar sanjeevan Mhatre. 

नवीन वर्षाची सुरुवात दिवा , ठाणे येथील " याल तर हसाल " च्या ६७१ वा कार्यक्रम ..!

नमस्कार ...!
नवीन वर्षाची सुरुवात दिवा , ठाणे येथील " याल तर हसाल " च्या ६७१ च्या कार्यक्रमाने झाली . श्री. राजकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या समारंभा निमित्त हा कार्यक्रम अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पर पडला. हा दिवा येथील याल तर हसाल चा दुसरा कार्यक्रम होता. रसिक प्रेक्षकांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.