Monday, July 23, 2018

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ..!

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ..!!

असंच काहीतरी होतं आषाढी एकादशीला ..! वैष्णवांच्या दिंड्या महाष्ट्रभर फेर धरू लागतात,आणि सारा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो .. आणि संतांचा महाराष्ट्र ही उक्ती मनोमन पटू लागते ..! ' भेदाभेद अमंगळ' शिकविणाऱ्या संतानी महाराष्ट्राला असं ज्ञान, असं वारसा , आणि  समाजप्रबोधनाचा असं वसा दिला आहे कि सारं त्रिभुवन यापुढे नतमस्तक होईल ...! ज्ञानदेवांनी रचलेल्या या 'वारकरी संप्रदायाच्या' पायावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कळस चढविला ..! ' एक एक ओवी अनुभवावी' अशीच भावना या साऱ्या संतांच्या अभंगरचना वाचताना वाटते. मन तल्लीन , भक्तिमय आणि शांत होते. ..! ज्ञानेश्वरांचे शब्द म्हणजे ईश्वरी ज्ञानच जणू ..अरे अरे ज्ञाना झाला से पावन
तुझे तुझ ध्यान, कळों  आले ...!
तुझा तूंचि देव , तुझा तू चि भाव
 मिटला संदेह अन्यतत्वी ...!!
वेडावून टाकतात हे शब्द ..! हे सगळ अनुभवताना 'दिव्यत्वाची प्रचीती' आल्यावाचून राहत नाही ..! विठ्ठलाने महाराष्ट्राला भक्तिमय केल आणि या भक्तिमार्गावर चालणाऱ्या  संतानी समाजाला सन्मार्गी लावण्याच आणि योग्य दिशा  देण्याच महत्कार्य केल ..! ' मनुष्य जन्माचे 'इहलोकीचे  कार्य ' सर्व संतानी उभ्या मानवजातीला समजावून सांगितलं. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' म्हणणाऱ्या जगदगुरु तुकाराम महाराजांचा शब्द म्हणजे रत्न च..! विठ्ठल भक्ती सांगताना तुकाराम महाराज म्हणतात ...
विठ्ठल जिविचा जिव्हाळा
विठ्ठल कृपेचा कोवळा
विठ्ठल प्रेमाचा उमाळा 
लावियेले चाळा ,
विश्व विठ्ठले ..!
आजच्या दिवसाला याची पुन्हा प्रचीती आल्याशिवाय राहत नाही ..! तुकोब्बरायांची एक एक ओवी अनुभवताना हरवून जायला होतं, ज्ञानाचा सागर पाहताना ....डोळे पाणावून जातात...एक वेगळी अनुभूती येते...! संत सांगतात....
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ..!
दु:खी गांजलेल्या समाजाला धीर देताना आणि परमेश्वर भक्ती हा उपाय सांगताना संत म्हणतात....
आवडीने भावे,
हरीनाम घेशी ,...
तुझी चिंता त्यासी,
सर्व आहे ...! 
शेवटी आषाढी एकादशी विषयी ...
पावलो पंढरी , वैकुंठ भवन ..
धन्य आजी दिन , सोनियाचा ....!
- संजीवन म्हात्रे ..!