Monday, January 8, 2024

AKKUA - आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन

सर्व उद्योजकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा 'मेसेज' खरं म्हणजे मला 1 जानेवारीलाच पाठवायचा होता, परंतु नवीन वर्षाच्या शुभेच्छा मध्ये हा मेसेज हरवून जाईल, म्हणून चार-पाच दिवस जाऊ दिले. आगरी कोळी कराडी उद्योजकांनी एकत्र येऊन व्यवसाय,उद्योगात प्रगती करावी, एकमेकांना मदत/सहकार्य करत व्यवसाय वृद्धी करावी, समाजातील पैसा समाजात रहावा.. यासाठी सर्व उद्योजकांनी एकत्र यावे, आपल्या समस्या एकोप्याने,  एकत्र येऊन सोडवाव्यात यासाठी AKKUA म्हणजेच आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन ची आपण सर्व मित्रमंडळींनी स्थापना केली. एकीचे बळ मिळते फळ ह्या उक्तीप्रमाणे, एकत्र आलो तर अनेक समस्या चुटकी सरशी सुटतील अशी सर्वांचीच आशा आहे. परंतु सर्वांना एकत्र कोण करणार ?  कोणत्या कारणासाठी सर्वजण एकत्र येणार? आणि मी या संघटनेत सामील झालो तर मला काय मिळणार ? माझ्या व्यवसायात कशी वाढ होणार ?  असे एक ना अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले असतील,  आणि त्यामुळेच आपला व्यवसाय भला आणि आपण भले ..! हा विचार घेऊन अनेक उद्योजक चालत राहतात. त्यामुळे उद्योजक हे सहसा समाज, संघटना, समाजकारण, राजकारण किंवा अशा प्रकारात ते उत्साह दाखवत नाहीत,आणि त्यामुळे संघटना स्थापन होऊन दोन वर्षात आपण व्हाट्सअप ग्रुप वरील 350 सदस्य ते सुद्धा Reference ने मिळालेले इथपर्यंत मजल मारली..! 350 लोकांचा व्हाट्सअप ग्रुप वर जाहिरात करून एखादं काम मिळालं तर उत्तम किंवा रेफरन्स साठी असले ग्रुप पाहिजे असतातच,  त्यातलाच एक ग्रुप म्हणून अनेकांनी याकडे पाहिले सुद्धा असेल. अर्थात संघटना म्हणून काही ठोस करायला आपल्याला जमलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही..!  आणि म्हणून हे जमणार च नाही असेही नाही ..! आपण व्यावसायिक आहोत, सुरुवातीला अपयश येतच ..ती यशाची पहिली पायरी आहे..!  त्यामुळे टिकून राहणे हे खूप महत्त्वाचा असतं. आणि कसल्याही परिस्थितीत संघटना दोन वर्षे टिकून ठेवली ..याच श्रेयही आपल्या सर्वांनाच ..!! 
2024 हे वर्ष प्रचंड उलथा पालथी चे वर्ष असणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुका या वर्षात होतील राजकारणाने हा देश ढवळून निघेल राजकारण हा एकमेव व्यवसाय आहे की काय अशी परिस्थिती होईल अनेक व्यवसाय निर्माण होतील,  काही नष्ट ही होतील. अनेक नवीन संधी निर्माण होतील.  काळाच्या ओघात हे सुरूच राहणार ..! 2024 याला अपवाद असणार नाही. परंतु या गदारोळात एकटा व्यवसायिक टिकेल की नाही ही शंकाच आहे. त्यामुळे  संकटांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हावे लागेल,  छोट्या मोठ्या अनेक व्यवसायिकांची, उद्योजकांची मोट बांधावी लागेल. आपण हे करण्यात यशस्वी झालो, तर सर्वांचंच भलं होईल,सर्वांनाच त्याची फळ मिळतील..!  आणि नाही झालो,  तर प्रत्येकाच आपल  स्वतंत्र आयुष्य आहेच. जगऱहाटी सुरूच राहते त्याप्रमाणे सर्व काही आहे तसेच चालत राहील. परंतु आपण उद्योग व्यवसायात यशस्वी झालो, आर्थिक स्वातंत्र्य आलं, तर आपल्याला बघून चार जण अजून उद्योग धंद्यात आले, समाजात एक उद्योग चळवळ सुरू करण्याचे श्रेय आपल्याला मिळालं,  संपूर्ण समाजा मध्ये आर्थिक साक्षरता आली तर चित्र बरचसं बदलेल..! आणि हो, केंद्र आणि राज्य शासनाच्या अगणित योजना उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी आहेत पण आपण त्याची माहिती घेणं तर सोडाच कधी त्यांचा फायदा घेण्याचा विचारही करत नाही याउलट कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात मात्र त्यांचा भलाभक्कम फायदा त्या त्या भागातली लोकं करून घेतांना दिसतात !म्हणून मित्र हो, थोडा वेळ काढा आणि AKKUA  मध्ये सामील व्हा ..! आपण सर्वजण बिझी आहेत,  आम्ही सुद्धा..!  परंतु जर आपण संघटितपणे, एकत्र येऊन, एकमेकांना मदत करत प्रत्येकाचा व्यवसाय वाढवण्यास मदत केली तर यासारखे दुसरा आनंद नाही ..! पुढे अजून व्यवसाय बद्दल लिहीतच जाईन..!  हा लेख फक्त AKKUA साठी लिहिला..! सर्वांना एकच विनंती उद्योगाची कास धरा..!  आर्थिक स्वतंत्र व्हा..!  आणि AKKUA मध्ये सामील व्हा..!  धन्यवाद ..!