खूप दिवस,
बाहेरच पडत नाही ...!
चिमण्यांची चर्चा झाडावर....
सर्व प्राणी अचंबित..
काय झालं समजत नाही
पण आता सिमेंट चा धुरळा नाही ..
गाड्यांचा धुर नाही ..
झाडांची तोडमोड नाही,
आणि..जमिनीवर सिमेंटचा आवरण नाही ..
एक प्राणी म्हणाला,
असं ऐकलंय की, आता तो बाहेर पडणारच नाही
निसर्गाला त्रास दिल्याबद्दल त्याला पश्चाताप झालाय म्हणे ..!!सर्वच बंद केलय त्यांन ,
नद्यांमध्ये घाण कमी झालीय,
समुद्र आता मोकळा श्वास घेतोय,
डोंगर फोडायला ही तो येत नाही आजकाल..!
त्यांना उंच उंच इमारती बांधायचा नाहीत ...?
वणवे लागून आपण होरपळलो,
त्याच्या कत्तली मधून सावरलो,
जंगलातून वाट फुटेल तिकडे पळालो,
तो आपल्याला कुठेच राहू देत नाही...
ना बिळात, ना पाण्यात, ना झाडावर ...
तो वेडा झाला होता का ...??
आपली मैत्री आणि जरुरत त्याला समजली नव्हती का ?
तो म्हणे सर्वात बुद्धिमान होता ...आपल्या प्राण्यांमध्ये ..!आपण हिंस्त्र आहोत म्हणे ....
पण तो तर .....
जाऊ दे ना यार .....सर्व प्राणी निराशेने म्हणाले....
पण मग..... बिघडलय
नक्कीच काहीतरी बिघडलय...
पण तो हार मानणारा नाही,
माहित आहे आम्हाला ...!
आणि त्याने हरू ही नये ...
अशी आमची इच्छा आहे आणि प्रार्थना सुद्धा ...!
पण आम्हाला ही जगू द्याव...
आमच्या संगतीत राहावं ...
आमचा मित्र, सखा ...पाठीराखा होऊन ...
सर्व प्राणिमात्रांच्या वतीने,
मानव पुन्हा मानवा सारखा होईल,
अशी प्रार्थना करूया ....तो आता सुधारला
आहे ..!!
15 एप्रिल 2020 ....
अरे बापरे ....पळा रे पळा....
एवढ्या गाड्या ...
अरे बापरे..... नाही तो नाही सुधारणार ...!!
आपण पळू या ....दूर ......
दूर अगदी खूप दूर ....परमेश्वराजवळ....!!
मानवाची कैफियत घेऊन...
आणि त्या विधात्याला विनंती करूया,
प्रचंड बुद्धि दिलीस या मानवाला तू....
आता थोडी अक्कल पण दे ..!!
सर्व प्राणिमात्रांना कडूनअर्ज सादर ...!!!
-- संजीवन म्हात्रे
27 मार्च 2020