Thursday, February 9, 2017

अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोली भाषेतील कथाकथन मध्ये- संजीवन म्हात्रे ( आगरी भाषा )

नमस्कार ..!
अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोली भाषेतील कथाकथन मध्ये ..प्रथमच आगरी भाषेचा समवेश होता ..आणि आगरी भाषेतून कथा सांगण्यासाठी आयोजकांनी माझी निवड केली होती ..महाराष्ट्रातून आलेल्या मान्यवर कथाकारांच्या पंक्तीत बसने हे सौभाग्यच ...आणि माझा श्वास असलेली आगरी भाषा संपूर्ण महाराष्ट्राला ऐकवणं हे तर परमभाग्यचं...! बाबा पारिट (कोल्हापुरी), प्रसाद कांबळी ( मालवणी) विलास सिंदागीकर ( मांगी), राम निकम ( मराठवाडी ), डॉ. सुमिता कोन्द्बात्तुनावर ( झाडी बोली ) सुनील गायकवाड ( अहिराणी ) आणि संजीवन म्हात्रे ( आगरी ) ...! साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नाव असणं हे देखील खूप प्रतिष्ठेच मानलं जातं...माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला हा सन्मान दिला ..त्याबद्दल आयोजकांचे आभार ..! आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांचे विशेष आभार .. ! 'पैशाचा पाऊस' या माझ्या कथेने उपस्थित रसिकांची वाहव्वा तर मिळवलीच ,,..परंतु आगरी भाषेची गोडी , लहजा, सुद्धा मान्यवरांना अनुभवायला मिळाला ...! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

No comments:

Post a Comment