चालत राहायचं ..सुख दुःखाची पळणारी झाडे दोन्ही बाजूनी पळत असतात...आभासी आहे ते सारं ..!! चालत राहणं हेच एकमेव सत्य ..अंतापर्यंत ..!!
अंत हा अंत आहे की,...सुरुवात पुन्हा नव्याची ...हे ही माहीत नाही आपल्याला ..!!
आत्मा अमर आहे हे सांगुन ठेवलंय आपल्याला ..!! जीवनाच्या वाटेवर शरीर समजतं...मग मन... कितीतरी जणांची आत्म्याशी गाठ पडतच नाही ..!!
चालत राहूया...हसत हसत ..गाठ पडेलच कधी न कधी ..!! तोपर्यंत ...
तुम भी चलो, हम भी चले..चलती रहे ...जिंदगी ..!!
- संजीवन म्हात्रे ( मनातलं-006 )
No comments:
Post a Comment