Sunday, September 20, 2020

बोलणं खुप महत्वाचं ..!!


नमस्कार ..!! 
बोलणं खुप महत्वाचं..! सध्याच्या रोजच्या परिस्थिती वर काय बोलणार ? सगळं काही बोलण्याच्या पलीकडचं सुरू आहे ...एका अनामिक भीतीच्या छायेखाली आपण वावरतोय ..!! 2019 मध्ये ही भीती नव्हती..की कुणीतरी दबा धरून बसलाय तो तुमचा जीव घेईल..!! बरं तो जीवघेणा आहे की नाही हे ही नक्की माहीत नाही ..तो जीव घेतोय की एका सिस्टिम ला आपण बळी पडतोय ..!! काय चाललंय कळत नाही...! यामुळे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक,मानसिक बदल घडताहेत ..या  सर्व बदलांना एकत्रितपणे सामोरे जाताना घुसमट होणे अनिवार्य आहे , स्वाभाविक आहे ..!! म्हणून व्यक्त व्हा,बोला ...ऐकून घेणार कुणी असेल तर फारच छान..!! प्रेशर कुकर सारखा 'सेफ्टी व्हॉल्व्ह' पाहिजे मनाला  ..!! ऐकून घेणार कुणी नसेल तर स्वतःशीच बोला, बोलता येत नसेल तर लिहा, कागदावर उतरवा...बघा..हलकं झालेलं मन भविष्याकडे बघत ...पॉझिटीव्ह विचारांचा मागोवा घेतं ..!! 
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

No comments:

Post a Comment