Friday, May 1, 2020

वाद्य ..!

मनातलं !! ,
एका बाजूनी वाजणारी ही वाद्य काळाच्या पाडद्याआड गेलीत ...किंवा त्यांचा उपयोग फार नाही राहिला..! सतत एकच आवाज करणारी वाद्य वेडी ठरलीत ..!! उलट कल ओळखून दोन्ही बाजूनी वाजण.. आज समझदारीचं , बुद्धिमत्तेच लक्षण झालंय..!! ज्यांना हे जमत नसेल अशा वाद्यांना कुठेही थारा नाही ..!! वाद्य कशी पाहिजेत आज...? एकातच सगळ वाजलं पाहिजे, आवाज बदलता आले पाहिजेत, काळ ओळखुन पट्टी बदलता आली पाहिजे आणि हो सर्वात महत्वाचं ...कधी कधी वाजण्याची क्षमता असून गप्प बसता आलं पाहिजे..! अशी वाद्य एकमेकांना धरून वाजत राहतात वाद्यवृंदात ..त्यांचा स्वतःचा आवाज  वाद्यवृंदात निरर्थक आहे  हे त्यांना ही माहीत असत... तरीसुद्धा...!  
 - संजीवन म्हात्रे ( मनातलं -004 ) 

No comments:

Post a Comment