पूर्ण दिवसाचा मुड सकाळवर ठरतो.!! सकाळ म्हणजे दिवसभराच्या नाटकाची नांदीच ..! जेवढी सकाळ प्रसन्न, तजेलदार आणि सकारात्मक ठेऊ, दिवस तेवढाच उत्तम आणि छान जातो..! निसर्गाने सकाळ यासाठीच निर्मित केली असावी ..!! ऋतु कोणताही असु दे , सकाळ नेहमी नयनरम्य आणि सुंदर असते ..! पानांवर हळूच ओघळणारे दवबिंदू, नुकतीच येऊन गेलेली पावसाची सर, हिवाळ्यात सकाळी असणारी धुक्याची चादर, न बोचणार ऊन , शुद्ध हवा, शांतता ...हे सर्व आत्म्याला सुखावणारं..मनाला दिलासा देणारं ..!! सकाळी जर ध्यान लावुन निसर्गाकडे पाहिलं , तर परमेश्वराचा आभास झाल्याशिवाय राहणार नाही ..आणि तेवढ्यात आपल्या किरणप्रभा सर्व जगावर पसरवीत अवतीर्ण होणार सूर्य ..!! हे बघताना मन भारावून न जाईल तरच नवल ..!! निसर्ग द्यायला आलेला असतो सकाळी सकाळी ...! तो तयार करतो तुम्हाला पुर्ण दिवसासाठी..!!सकाळ निसर्गाच्या सानिध्यात जाऊन साजरी केली पाहिजे ..! रोज हा अमृताचा झरा, प्राशन करून दिवसभराच्या आव्हानांसाठी तयार झालं पाहिजे..! व्यायाम, ध्यान करत असाल तर सकाळ आणखी छान होईल ..! म्हणून सकाळ अनुभवा.. जीवन समृद्ध बनवा .!!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .
Tuesday, November 13, 2018
सकाळ अनुभवा ..!! जीवन समृद्ध बनवा ..!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment