Wednesday, November 18, 2015

शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर २०१५ रोजी नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्त गावांमधील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याच्या  अनुषंगाने आणि प्रकल्पग्रस्त गावांना फक्त नियमित नव्हे तर स्मार्टपणे नियमित करण्याच्या अनुषंगाने " स्मार्ट विलेज " या सदराखाली 'खुले चर्चा सत्र  'कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिरातील श्री . मोरेश्वर चिंतामण पाटील सभागृहात आयोजित करण्यात आले होते . निवडक उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या चर्चा सत्रात नवी मुंबईतील विविध गावांमधील ७० एक लोकांनी यात सहभाग घेतला . आगरीकोळी हास्यप्रबोधनकार श्री . संजीवन म्हात्रे यांच्या आगरी कोळी शैलीतील मार्गदर्शनपर भाषणाने पहिल्या सत्राची सुरुवात झाली . ज्यात त्यांनी त्यांच्या शैलीत हसवत आणि चिमटे घेत सामाजिक भावनेला हात घालत चर्चासत्रासाठी पोषक अशी वातावरणनिर्मिती केली .  

No comments:

Post a Comment